Posts

Showing posts with the label Portuguese
Image
एकमेव प्रवेशद्वार पाटो ब्रिज   गोव्याची राजधानी पणजी येथे चारशे-पाचशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या काही वास्तू आणि इतर बांधकाम आहेत. पोर्तुगीज राजवटीची पहिली राजधानी असलेल्या ओल्ड गोवा येथे तर त्याहून अधिक जुनेपुराणे बांधकामे आहेत. पोर्तुगिजांनीं आपली राजधानी नोवे गोवा किंवा पणजी येथे १८४३ या साली हलवली आणि त्यानंतर इथला आधीच असलेला आदिलशाहचा राजवाडा मग पोर्तुगीज इंडियाचे मुख्यालय बनला. त्यानंतर या पणजी येथे पोर्तुगीजांनी पाश्चात्य धर्तीच्या अनेक इमारती बांधल्या, पोर्तुगीज राजवटीच्या वेगवेगळ्या खात्यांची आणि संस्थांची कामकाज या इमारतींतून चालायचे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतीय लष्कर पाठवून गोवा, दमण आणि दीव पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केला आणि मग पोर्तुगीजकालीन या इमारती विविध सरकारी खात्यांची, लष्करी विभागांची कार्यालये बनल्या. मांडवीच्या तिरावरचे आदिलशाह पॅलेस अनेक वर्षे गोवा, दमण आणि दिवचें सचिवालय आणि विधानसभा भवन होते. पणजी येथे फॉन्टइनेस, कंपाल आणि अल्तिन्हो येथे सहज एक फेरफटका मारला तर पोर्तुगीजकालीन तीनशे-चारशे वर्षे जुनी असलेल्या आणि आजही अगदी सुस्थितीत अ...
Image
  पंडित नेहरु आणि गोवा .... ``गोवा के लोक अजीब है'' ( मांडवीतून बोटीने पणजीत आलेल्या पंतप्रधान पंडित नेहरुंचा हा दुर्मिळ फोटो. पंडितजींनी गोव्याला २२ मे १९६३ रोजी पहिल्यांदाच भेट दिली. ) `` पोर्तुगीजांची वसाहत असणाऱ्या गोव्याच्या मुक्तीसाठी १९५५ साली गोव्यात आपला ऐतिहासिक सत्याग्रह करण्यापूर्वी समाजवादी नेते श्री. ना. ग. उर्फ नानासाहेब गोरे यांनी त्यावेळच्या गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला एक पत्र लिहिले होते. गोव्यात सत्याग्रह करण्यामागील आपली भूमिका त्यांनी या पत्रात स्पष्ट केली होती. `आमच्या या कृतीने तुमची सत्ता मोडेल असे मानण्याचे अतिरेकी धाडस आम्ही करत नाही’ अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली होती पण या वाक्याला जोडूनच त्यांनी लिहिले होते. ``परंतु आमच्या प्रयत्नांचा काहीच परिणाम होणार नाही असे मात्र आम्हाला वाटत नाही. गोव्याच्या लढ्यात आम्ही (गोवेकर सोडून इतर भारतीय) सहभागी केल्यामुळे गोवा आणि भारत यामधील कृत्रिम सरहद्दीच्या दोन्ही बाजूस राहणारे लोक शाश्वत बंधुप्रेमाने एकत्र येतील. शिवाय ज्यांचा भविष्यकाळ सध्या पोर्तुगालच्या हातात आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची सुप्रभात...
Image
  बार्देसकर समाजाच्या स्थलांतराची, त्यामागच्या कारणांची आजपर्यंत इतिहासकारांनी दखल घेतली नव्हती… ‘अक्षरनामा’ पडघम  - सांस्कृतिक कामिल पारखे ‘द बार्देसकर्स - द हिस्टरी ऑफ मायग्रेशन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ Thu , 20 May 2021 पडघम सांस्कृतिक ख्रिस्ती धर्म रोमन कॅथोलिक द बार्देसकर्स - द हिस्टरी ऑफ मायग्रेशन फादर बिशप ही १९७६ची गोष्ट आहे. दहावीची परीक्षा दिल्यानंतर श्रीरामपूर येथील घर सोडून मी फादर प्रभुधर यांच्यासारखा जेसुईट (येशूसंघीय) धर्मगुरू होण्यासाठी कराड येथील त्यांच्या ‘स्नेहसदन’ या निवासस्थानी दाखल झालो. सोसायटी ऑफ जिझस या कॅथोलिक धर्मगुरूंच्या संस्थेच्या सदस्यांना ‘जेसुईट’ म्हणतात. कॅथोलिक चर्चमध्ये अशा फादरांच्या आणि नन्स वा सिस्टरांच्या शेकडो संस्था आहेत. उदा. डॉन बॉस्को (सॅलेशियन) फादर्स, मदर टेरेसा सिस्टर्स, फ्रान्सिलीयन फादर्स. सध्याचे पोप फ्रान्सिस हे सर्वोच्च पदावर पोहोचलेले जेसुईट संस्थेतील पहिले धर्मगुरू आहेत. कराडला आल्यावर एका वेगळ्याच ख्रिस्ती समाजाची मला ओळख झाली. फादर प्रभुधर मला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, राधानगरी, गारगोटी, कागल व चंदगड आणि कर्ना...

`टाइम्स ऑफ इंडिया'तली पान एकची पहिली बायलाईन

Image
  टाइम्स ऑफ इंडियाने २००० साली पुण्यात नव्यानेच स्वतंत्र आवृत्ती सुरु केल्यानंतर तेथे महाराष्ट्र पानाची जबाबदारी सांभाळण्यासाठी `इंडियन एक्सप्रेस'मधून माझी निवड करण्यात आली होती. पत्रकारितेतील माझा मित्र अभय वैद्य आणि निवासी संपादक शेरना गांधी यांनी माझी यासाठी निवड केली होती. अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगैरे परिसरात आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत पोहोचणाऱ्या या खास म्हाफुसिल आवृत्तीतील महाराष्ट्र पान असलेल्या पान दोनला सर्व मजकूर पुरवण्याची माझी जबाबदारी होती. टाइम्स ऑफ इंडिया'च्या जुळ्या भावंडाच्या म्हणजे `महाराष्ट्र टाइम्स'च्या पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बातमीदारांनी फॅक्सवर पाठवलेल्या मराठी बातम्यांचे मी भाषांतर करुन आणि वृत्तसंस्थांच्या बातम्यांनी हे पूर्ण पान भरले जायचे. सांगलीचे रविंद्र दफतरदार, कोल्हापुरचे प्रभाकर कुलकर्णी, सोलापूरचे रजनीश जोशी आणि शिर्डीचे ताराचंद म्हस्के यांच्याकडून रोज बातम्यांचा रतीब यायचा. अधूनमधून मी स्वतंत्र म्हणजे माझ्या बायलाईनच्या बातम्याही लिहित असायचो. तर त्यादिवशी मी माझा एक मजकूर न्यू...