Posts

Image
  Sorpotel  गोव्यात पणजीला हायर सेकंडरी आणि पदवीचे शिक्षण घेताना आमच्या हॉस्टेलात ही प्रथा होती. दरदिवशी आमच्या हॉस्टेलात किचनमध्ये भरपूर ओला आणि सुका कचरा निर्माण होई तो सिंकच्या खाली असलेल्या एका मोठ्या डब्यात जमा होई. दररोज रात्री नवाच्या आसपास आमची जेवणे उरकल्यावर शेजारच्या एका घरातली लोक हा गच्च भरलेला डबा नेत आणि त्याजागी दुसऱ्या दिवसासाठी मोकळा डबा ठेवत. या डब्यात रोज गोळा होणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या, फळांच्या आणि इतर साली, उरलेला भात, पाव वगैरे अन्नधान्य तो शेजारी आपल्या पिगरीत असलेल्या डुकरांना खाऊ घालत असे. पिगरी म्हणजे डुकरे पोसतात ती जागा. त्याकाळी गोव्यात सगळीकडे डुकरे दिसायची. गोवा आणि डुकरे एक अविभाज्य संबंध होता. मारिओ मिरांडा यांचे गोव्यासंबंधीचे कुठलेही व्यंगचित्र शेपूट वळवळणारे डुक्कर दाखविल्याशिवाय पूर्ण होत नाही, त्याचे हे कारण. घरांघरांतून असे भरपूर उरलेले अन्नधान्य वगैरे खाद्यपदार्थ डुकरांसाठी रोज मिळत असे. यात अर्थात कुठल्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण नसायची. अपवाद एकच. वर्षांतून दोनदा म्हणजे डिसेंबरात ख्रिसमसला आणि मार्च-एप्रिलमध्ये ईस्टर फेस्ताला आम्ह
  `हा, तर आज तुमच्यापैकी किती  जणांनी उपवास केला आहे ?''   प्रवचन करणाऱ्या धर्मगुरुंनी अचानक हा प्रश्न  केला अन देवळात एकदम शांतता पसरली.  तशीही जगभरच्या आमच्या सर्वच देवळांत हजारोंचा समुदाय असला तरी तशी शांतता असतेच,  ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्राचे उत्तम नमुने असलेल्या आणि त्यामुळे आता केवळ पर्यटन  वास्तू ठरलेल्या युरोपातील अनेक देवळे अर्थात याला पूर्ण अपवाद.  व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिकातील सर्वाधिक अतिपवित्र मानलेल्या सिस्टाईन चॅपलमध्ये पर्यटकांचा असाच गोंगाट मी अनुभवला आहे.  मायकल अँजेलोच्या ती जगप्रसिद्ध छतावरील आणि भिंतीवरील चित्रे पाहताना न राहवून मीसुद्धा त्या कोलाहलात सामील झालो होतो.  तर धर्मगुरुंनी तो प्रश्न विचारला तेव्हा काही काळ  शांतता पसरली आणि केवळ दोनचार हात वर झाले.  ही खूपच आश्चर्याची गोष्ट होती.  कारण हा प्रश्न विचारला गेला तो कालचा दिवस होता ऍश वेन्सडे, भस्म किंवा राखेचा बुधवार.  चाळीस दिवसांच्या उपवासकाळाची या दिवसापासून सुरुवात होते आणि गुड फ्रायडेला त्याची समाप्ती होती.  या  चाळीस दिवसांत अर्थात वेगळ्या अर्थाने पवित्र असणाऱ्या रविवारचा समावेश
Image
  Lalita Pawar: कजाग खलनायिकी भूमिकेमागे दडलेली मायाळू आई मराठी-हिंदी चित्रपटात काम करून देशातील लोकामंध्ये आपली खास प्रतिमा निर्माण करणारी एका प्रतिभावंत अभिनेत्री ललिता पवार  मनोरंजन Lalita Pawar Death Anniversary  esakal कामिल पारखे Updated on:  24 February 2023, 9:51 am Lalita Pawar Death Anniversary :  त्या दिवशी मुलाखत घेण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा खरे म्हटले तर मला धडकीच भरली होती. मुलाखत घेण्यासाठी वा पत्रकार परिषदेला जाताना असे सहसा कधी होत नाही. पत्रकार परिषद घेणारी एखादी व्यक्ती खवचट असते. एखादा अडचणीचा प्रश्न विचारला तर उत्तर देण्याऐवजी प्रश्नकर्त्याचा अपमान करण्याची तिची सवय असते. पण त्यामुळे पत्रकारांनी घाबरून जाण्याचे कारण नसते. त्या दिवशी मी ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार होतो, त्या व्यक्तीच्या माझ्या आणि एकूण समाजमानसात असलेल्या प्रतिमेमुळे ही भीती निर्माण झाली होती. कारण युनिक फीचर्ससाठी मी ज्यांची मुलाखत घेण्यासाठी चाललो होती, ती व्यक्ती होती ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार. ही घटना असेल १९९२च्या दरम्यानची. आदल्या दिवशी मी ललिता पवार यांच्याशी फोनवर बोलून मुलाखतीची वेळ ठरव
Image
  Lalita Pawar When I went out for the interview that day, I was a little scared. This is usually not the case when I am going for an interview or a press conference. A person – especially a political VVIP or a celebrity – holding a press conference is sometimes arrogant and tough to handle for a novice reporter.  When asked a difficult or awkward question, the person may tend to insult the questioner instead of answering the question. But that does not necessarily cause us journalists to panic. The reason why I was scared of conducting this interview was the image and persona of the person whom I was going to interview that day. The person I was to interview for the Unique Features agency that day was no other than veteran actress Lalita Pawar. This incident must have happened around 1992. The day before, I had spoken to the actress on her residence landline telephone and fixed an appointment with her for the interview.  Speaking at the time, she had given her home address. ‘My flat i
Image
सत्ताबदल भारतात अनेक वर्षे केंद्रात आणि सर्व राज्यांत काँग्रेस पक्षाची सत्ता होती. काँग्रेसच्या या निरकुंश सत्तेला पहिला जोरदार धक्का बसला तो १९६७ साली. . त्यानंतर देशात सर्वांत मोठा सत्ताबदल झाला तो १९७७ साली, इंदिराबाईनीं आणीबाणी शिथिल करून निवडणूका घेतल्या तेव्हा. त्यावेळी मी केंद्रीय मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या कराड शहरात अकरावीला होतो. आणीबाणीपूर्व काळ, आणीबाणीचा काळ मी जसा अनुभवाला तसा आणिबाणीत्तोर काळही मी अनुभवला. सत्ताबदल कसा होतो हे त्यावेळी मी पहिल्यांदा अनुभवले. (नंतर पत्रकार म्हणून अनेक निवडणुका अगदी जवळून बघितल्या.) त्यावेळच्या १९७७ लोकसभा निवडणुकात कॉग्रेस पक्षाला पहिल्यांदाच जबर धक्का बसला. दक्षिण भारतात महाराष्ट्राने काँग्रेसविरोधी लाट काही प्रमाणात थोपवली. राज्यातील एकूण ४८ जागांपैकीं निम्म्या जागा काँग्रेस पक्षाने गमावल्या महाराष्ट्रात कोंग्रेसच्या या पराभवाचे एक महत्त्वाचे कारण काही अराजकीय व्यक्तीनीं घेतलेल्या सक्रिय भूमिका होत्या. त्याआधी एकदोन वर्षे इचलकरंजी आणि नंतर कराडला मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. पन्नासाव्या इचलकरंजी संमेलनाचे पु,
Image
'गांधीहत्या आणि   'माथेफिरु' नथुराम गोडसे गोव्यात पणजी येथे मिरामार समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या धेम्पे कॉलेजात माझे पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले आणि माझा मुख्य विषय होता तत्त्वज्ञान. त्यात एक वर्षी फिलॉसॉफी ऑफ रिलीजन म्हणजे चक्क 'विविध धर्मांचे तत्त्वज्ञान" हा एक विषय होता. श्रीरामपूरला दहावीपर्यंत मराठी भाषेत शिकून येसुसंघिय फादर होण्यासाठी सत्तरच्या दशकात मी गोव्यात आलो होतो. कौटुंबिक पार्श्वभूमी कॅथोलिक धार्मिक अशी होती, नाही तर जीवनभर संन्याशी धर्मगुरु होण्याचा कुणी विचारही केला नसता. मँगोलोरियन कॅथोलिक कुटुंबातून आलेले समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस हेसुध्दा शालेय शिक्षणानंतर असेच फादर होण्यासाठी सेमिनिरीत दाखल झाले होते. पदवीला मी तत्त्वज्ञान हा विषय घेण्याचे एक कारण म्हणजे धर्मगुरु होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तत्वज्ञान आणि ईशज्ञान ( थिऑलोजी ) या विषयांचा अभ्यास करावा लागतोच, नाहीतर फॉर्मेशन टप्प्यालाच गच्छंती होते. धर्मगुरु होण्यासाठी किमान तेव्हढी बौद्धिक पातळी आवश्यक आहे असे जेसुईट संस्था मानते. माझ्या आसपासचे काही जेसुईटस शिक्षण तज्ज्ञ होते काही