Posts

Image
  सत्तरच्या दशकात गोव्यात मिरामारला धेम्पे कॉलेजात तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना मला पहिल्यांदा `नक्षलबारी’ या शब्दाची ओळख झाली. गंमत म्हणजे तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी म्हणून कार्ल मार्क्सच्या विचारांचा अभ्यास करत असलेला मी त्यावेळी आजन्म अविवाहित राहून ख्रिस्तीधर्मिय जेसुईट फादर होण्यासाठी प्रशिक्षणही घेत होतो. सत्तरच्या दशकात (आणि त्याकाळाआधीसुद्धा) उच्चशिक्षणाच्या कॉलेज-विद्यापीठ आवारांत आम्हा झेन झी पोरांपोरींना डाव्या विचारसरणीने मोठ्या प्रमाणात भुरळ घातली होती साठीच्या आणि सत्तरच्या दशकांत नक्षलबारी हे नाव देशात गाजू लागले. आतापर्यंत हे नाव विविध संदर्भांत या ना त्या कारणांनी कायम येत राहिले आहे. खरे पाहता पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी हा छोटासा परीसर होता. येथील शोषक जमीनदारी वर्गाविरुद्ध काही कम्युनिस्ट नेत्यांनी सशस्त्र उठाव केला आणि देशात नक्षलबारी चळवळीचा उगम झाला. चारू मजूमदार आणि कानू सन्याल ही या चळवळीतील दोन प्रमुख नावे. जातपात, हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन असले धर्म तसेच लिंगाधारित कुठलेही भेद न मानता केवळ आर्थिक प्रश्नांवर सामाजिक आणि राजकिय सं...
Image
  तुम्ही कधी उघडी प्लास्टिक टोपली म्हणजे बास्केट किंवा कुलुपबंद, सील केलेलं दानपत्र घेऊन लोकांमध्ये, गर्दीत जाऊन रक्कम गोळा केली आहे का? अशी कामे मी स्वतः अनेकदा करत आलो आहे. या दोन्ही प्रकारांत नंतर गोळा केलेली नाणी, नोटा आणि मूल्यवान ऐवज यांची मोजदाद करावी लागते. गोळा झालेलूया रकमेची आणि ऐवजांची रीतसर नोंद करून त्यावर सह्या आणि शिक्का लावून ते नंतर मुख्य आयोजकांकडे सोपवावे लागते. एकदा रक्कम आणि कागदपत्रे संबंधितांकडे सोपवल्यानंतर तुमची जबाबदारी संपते आणि ती जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा त्या संस्थेच्या विश्वस्तांकडे जाते. कधीकधी देवळांत उपासनाविधीदरम्यान दानपात्र घेऊन भाविकांमध्ये फिरून दान गोळा करावे लागते. आता सवयीने अशावेळी कसे वागावे, कुणापुढे दानपत्र न्यावे याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. दानपत्र सभोवताली फिरत असताना एखाद्याची झाकलेली मूठ पाहून, एखादी व्यक्ती खिशांत किंवा पर्समध्ये हात घालताना पाहिल्यानंतरच तिकडे त्या दिशेने दानपत्र नेले जाते. एखादी व्यक्ती पॅन्टच्या आणि शर्टच्या खिशांत चाचपडून नंतर शांत बसते. एखादी व्यक्ती मात्र अगदी स्थितप्रज्ञपणे बसून राहिली असली...
Image
  दोनशेचौदा वर्षांपूर्वी अमेरिकेतून दोन स्वतंत्र जहाजांनी काही प्रवाशी भारताच्या दिशेने एका आगळ्यावेगळ्या कामगिरीवर निघाले होते. गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट आणि त्यांच्या पत्नी रॉक्सना नॉट ११ फेब्रुवारी १८१३ रोजी मुंबई बंदरात पोहोचले आणि १२ तारखेला ते किनाऱ्यावर उतरले. सॅम्युएल न्यूवेल ७ मार्च १८१४ रोजी मुंबईत त्यांना सामिल झाले. या मिशनरींच्या आगमनाने भारतात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. या मिशनरींनी देशात आधुनिक शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारीक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्त्री-पुरुष असा लिंगभेद न करता, जात-धर्म म्हणजे उच्च जाती, शूद्र, अतिशूद्र किंवा अस्पृश्य असा विचार न करता शिक्षणाची कवाडे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वांना उघडी केली होती आणि अशाप्रकारे आधुनिक सार्वत्रिक शिक्षणपद्धतीचा पाया रचला केला. आजही गॉर्डन हॉल हे नाव तसे फारसे परिचित नाही. आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असणाऱ्या गॉर्डन हॉल या महान व्यक्तीची इतिहास संशोधकांनी मुळी दखलच घेतलेली नाही. बुधवार ८ एप्रिल रोजी गॉर्डन हॉल यांची जयंती आहे. जडसन आणि सॅम्युएल न्यूवेल हे ९ फेब्रुवारी १८१...