Posts

Showing posts from September, 2022
Image
 पुण्याने राष्ट्रपातळीवर केलेले  नेतृत्व  पुण्यात इंडियन एक्सप्रेसला मी १९८९ ला जॉईन झालो तेव्हा पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या एका वादळी चर्चेला मी हजर होतो. विषय होता एरंडवणे परिसरातल्या सर्व्हे नंबर ४४ मध्ये टेकडीवर बांधकामास परवानगी देण्याबाबत. या प्रस्तावाला विरोध करत सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्याच नगरसेविका वंदना चव्हाण यांनी अत्यंत आक्रमकतेतेने हा विषय लावून धरला होता.  इंडियन एक्सप्रेसचे पुणे निवासी संपादक प्रकाश कर्दळे यांच्यासह आम्ही इतर काही बातमीदार या सभेला उपस्थित असण्याचे कारण म्हणजे इंडियन एक्सप्रेस फोरमने हा पर्यावरणाचा विषय हाती घेतला होता. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजर राहण्याची ही माझी पहिली आणि एकमेव वेळ.  राज्यपातळीवर, देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या स्थानिक संस्थेच्या सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कारभाऱ्यांनी नेतृत्व केले आहे हे नंतर माझ्या लक्षात आले.  डॉ मं पा मंगुडकर यांनी पुणे महापालिकेच्या शंभराव्या वर्धापनानिमित्त संपादित केलेल्या स्मरणिकेत या संस्थेच्या आणि पुणे शहराच्या इतिहासाचा मागोवा घेतला आहे. ती स्मरणिका वाचताना या
Image
 न्यूड फोटोज वाद    आपल्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी त्या चित्रपटाचे अभिनेते आणि अभिनेत्री पुण्यातल्या 'सकाळ टाइम्स'च्या कार्यालयात येत असत. अशा मुलाखती देणे हा त्या चित्रपट कलावंतांनी चित्रपट निर्मात्यांशी केलेला कराराचा भागच असतो, हे चित्रपट कलाकार अशा मुलाखतीला सामोरे जाण्यास नकार देऊ शकत नाही हे नंतर लक्षात आले.    विशेष म्हणजे सर्वच दैनिके आणि नियतकालिके अशा प्रकारच्या अरेंजड मुलाखतीसाठी काही लाख रुपयांचे पॅकेज निर्मात्यांकडून घेत असतात हे कळले तेव्हा मी आश्चर्याने तोंडात बोट घातले आणि त्याचवेळी एक पत्रकार म्हणून शरमेने मान खाली घातली होती.   अशा प्रकारच्या जाहिराती सॉफ्ट बातम्यांच्या स्वरूपांत देण्याची परंपरा पुण्यात सर्वप्रथम 'टाइम्स ऑफ इंडिया' ग्रुपने म्हणजे बेनेट अँड कोलेमान वृत्तसमुहाने सुरु केली आणि हे अभिनव आर्थिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर धोरण मग इतर वृत्त समुहांनीसुद्धा लगेचच आपलेसे केले.    अशा प्रकारच्या प्रायोजित मुलाखती संपादकीय विभागातील फीचर्स टीममधले सहकारी घ्यायचे. फीचर्स विभाग म्हणजे सॉफ्ट बातम्या देणारे लोक म्हणून या विभागातले सर्वच
Image
 पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुका     उद्या रविवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुका आहेत.  निवडणुका होणार आहेत म्हणून बरे वाटले.   पुणे युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस (Puwj) त निवडणुका मी सुरु केल्या.   मी पुण्यात आलो तेव्हा या संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व्हायच्या. ही पद्धत बंद व्हावी म्हणून १९९१ आणि ,१९९२ ला मी सलग दोन वर्षे अध्यक्ष आणि इतर पदांसाठी अर्ज भरले. त्यामुळे निवडणूक घ्यावीच लागली.    सहमतीने धोरण सोडून मी सहकारी साखर कारखान्याच्या प्रमाणे निवडणूक लादली म्हणून वरुणराज भिडे यासारखे त्यावेळचे अनेक बुजुर्ग पत्रकार माझ्यावर खवळले होते. (सहकारी साखर कारखाने म्हणजे सर्व दुर्गुणांचा पुतळे अशी भावना फार आधीपासूनच आहे. )   अर्थात निवडणुकीत सपाटून पडलो. पहिल्या वेळेस सकाळ चे राजीव साबडे यांच्याविरुद्ध तेरा मते मिळाली, दुसऱ्या वेळेस सत्तावीस.   तिसऱ्या निवडणुकीत मी आणि पराग रबडे मिळून अख्खे पॅनल निवडून आणले.    गेल्या तीस वर्षांत त्यानंतर आजपर्यंत दुसरी कुणी महिला सरचिटणीस झालीच नाही.   पुण्यात puwj महिला अध्यक्ष तर नाहीच नाही.    त्याआधी मी गोवा युनियन ऑफ जर्ना
Image
राजे चार्ल्स तृतीय, पद्मिनी कोल्हापुरे, राणीसाहिबा एलिझाबेथ, इंग्लंडच्या राणीसाहिबा एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या पार्थिव अवशेषांची अंतिम यात्रा सुरु झाली आहे. त्यांचा पार्थिव देह लंडनला आणण्यासाठी प्रवास होतो आहे तेव्हा ठिकठिकाणी हजारो लोक या राणीला अखेरचा मानदंड देण्यासाठी फुले घेऊन उभे राहत आहेत असं बातम्यांतून दिसतं. इंग्लंडविषयी आणि या देशाचे वैभव अनुभवलेल्या, त्या वैभवाचा एक हिस्सा असलेल्या राणीसाहिबाबद्दल जगभर कुतूहल तर आहेच आणि संमिश्र भावनाही आहेत. दिडशे वर्षे इंग्लंडने भारतीय उपखंडाला गुलामगिरीत ठेवले, या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी हजारो लोकांनी आपले रक्त आणि घाम गाळले. आणि तरीसुद्धा आपल्या देशात इंग्लंडविषयी कटुतेची भावना नाही. राणीच्या मृत्यूविषयी शोक करण्यासाठी एक दिवस सुतक पाळून आणि देशाचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून भारताने हे दाखवून दिलं आहे.  इंग्लंडविषयी भारतीय जनतेत एक सुप्त आकर्षण आहे. बहुधा जगभर अनेक देशांतील लोकांत, विशेषतः ब्रिटिश वसाहती असलेल्या राष्ट्रांत- अशी भावना असणं शक्य आहे. अमेरिकेविषयीसुद्धा असच आकर्षण आहे.  भारतातील अनेक लोकांना इंग्लंडमध्ये स्
Image
  दलित पॅन्थर, नामदेव ढसाळ, नारायण आठवले गोव्यातील कॉलेजशिक्षणाचा आणि नंतर बातमीदाराच्या नोकरीचा काळ संपवून ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस मी महाराष्ट्रात परतलो, औरंगाबादला `लोकमत टाइम्स'ला रुजू झालो तेव्हा राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांपासून आणि राजकारणापासून आपण फार काळ दूर राहिलो होतो याची जाणीव झाली . औरंगाबाद शहरात आणि मराठवाड्याच्या अनेक भागांत त्याकाळात `भारतीय दलित पॅन्थर' असे फलक दिसत. हे नाव वाचून कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण झाली.    फार पूर्वी मी श्रीरामपूरला शाळेत असताना सत्तरच्या दशकात दलित पँथरची स्थापना झाली होती, मुंबईतील त्याकाळातल्या दंगली आणि अशांत सामाजिक परिस्थिती याविषयी अंधुक आठवत होतं, मात्र इनमिन अडीच वर्षे मात्र खळबळजनक आयुष्य लाभलेल्या या संघटनेविषयी फार माहिती नव्हती.    अशा प्रकारची फलके त्या संघटनांचं त्यात्या परिसरातलं अस्तित्व आणि ताकद दाखवून देत असतात. आपल्या परिसरात स्वतःच्या वाढदिवसानिमित्त फ्लेक्स उभारून काय पडसाद उमटतात याचा अनुभव घ्या म्हणजे मी काय म्हणतो आहे हे कळेल. अशी फलके उभारणं म्हणजेच प्रस्थापित घटकांविरोधी आव्हान तयार
Image
  Fr. Hermann Bacher  Father of the Watershed Movement in India   Fr. Hermann Bacher, the ‘Father of the Watershed Movement in India’, was the parish priest in Shrirampur in Ahmednagar district in 1960s and 1970s when I was a school student there.    As a boy, I watched him from a distance but never had an occasion to speak to him. Never did I think then that I would later write a biography in English and Mararhi of this great missionary.    In tribute to Fr. Hermann Bacher on his first death anniversary on September 14, representatives from around 270 villages in Ahmednagar district have come together to celebrate his life and his work.   Fr. Hermann Bacher Memorial rally will be held at ADCC Auditorium in Ahmednagar.   Bacher Baba came to India from Switzerland and made the district of Ahmednagar his home for over 60 years.   In 1967, Bacher Baba founded the Social Centre in Ahmednagar to work for the upliftment of the poor and marginalized farmers in the drought prone region
Image
प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचे लग्न   गोव्यातील वृत्तपत्रात लंडनच्या शाही लग्नाचे फोटो मिळविण्यासाठी २९ जुलै १९८१ला आम्ही केलेला हा आटापिटा. प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचे लग्न ठरले, तेव्हाच ते विसाव्या शतकातील सर्वांत मोठे शाही, सेलेब्रिटी लग्न असेल असे म्हटले जात असे. ब्रिटिश राजघराणे , ब्रिटिश पर्यटन खाते आणि संपूर्ण जगभरातील प्रसारमाध्यमांतून या होणाऱ्या विवाहाविषयी प्रचंड गाजावाजा केला गेला. त्यात तसे वावगे असे काहीही नव्हते.    यापूर्वी म्हणजे तीन दशकांपूर्वी १९४७ला राणी एलिझाबेथ व्दितीय यांचा स्वतःचा विवाह झाला तेव्हा ग्रेट ब्रिटन हे जगातले एक प्रमुख राष्ट्र असले तरी प्रसारमाध्यमांचे क्षेत्र आताइतके जनसामान्यांपर्यंत पोहोचले नव्हते.    मात्र १९८०च्या सुरुवातीच्या काळात प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांची एंगेजमेंज वा साखरपुडा झाला तेव्हा रेडिओ सामान्य माणसांपर्यंत पोहोचला होता, वृत्तपत्रे शहरांत आणि खेड्यापाड्यांत जाऊ लागली होती आणि ब्लँक अँड व्हाईट टेलिव्हिजनचे भारताच्या काही प्रमुख शहरांत आगमन झाले होते.    एके काळी ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळत नसे.