सत्ताबदल भारतात अनेक वर्षे केंद्रात आणि सर्व राज्यांत काँग्रेस पक्षाची सत्ता होती. काँग्रेसच्या या निरकुंश सत्तेला पहिला जोरदार धक्का बसला तो १९६७ साली. . त्यानंतर देशात सर्वांत मोठा सत्ताबदल झाला तो १९७७ साली, इंदिराबाईनीं आणीबाणी शिथिल करून निवडणूका घेतल्या तेव्हा. त्यावेळी मी केंद्रीय मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या कराड शहरात अकरावीला होतो. आणीबाणीपूर्व काळ, आणीबाणीचा काळ मी जसा अनुभवाला तसा आणिबाणीत्तोर काळही मी अनुभवला. सत्ताबदल कसा होतो हे त्यावेळी मी पहिल्यांदा अनुभवले. (नंतर पत्रकार म्हणून अनेक निवडणुका अगदी जवळून बघितल्या.) त्यावेळच्या १९७७ लोकसभा निवडणुकात कॉग्रेस पक्षाला पहिल्यांदाच जबर धक्का बसला. दक्षिण भारतात महाराष्ट्राने काँग्रेसविरोधी लाट काही प्रमाणात थोपवली. राज्यातील एकूण ४८ जागांपैकीं निम्म्या जागा काँग्रेस पक्षाने गमावल्या महाराष्ट्रात कोंग्रेसच्या या पराभवाचे एक महत्त्वाचे कारण काही अराजकीय व्यक्तीनीं घेतलेल्या सक्रिय भूमिका होत्या. त्याआधी एकदोन वर्षे इचलकरंजी आणि नंतर कराडला मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. पन्नासाव्या इचलकरंजी संमेलनाचे पु,...
Posts
Showing posts with the label Shining India