पुढील नूतन वर्षारंभात सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि नाशिक येथे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलने होत आहेत. या निमित्ताने दोन्ही संमेलनांचे आयोजक लगीनघाईत असताना यानिमित्ताने गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या आणि स्वागताध्यक्षांच्या भाषणांचे मी संकलन करत आहे. मराठी `ग्रंथकारांच्या' संमेलनाबाबत पहिला विद्रोही सूर लावला होता तो महात्मा जोतिबा फुले यांनी. त्यावेळी नगरच्या अमेरिकन मराठी मिशनच्या `ज्ञानोदय' मासिकात प्रसिद्ध झालेले 'घालमोड्या दादां'ना उद्देशून लिहिलेले त्यांचे पत्र आता सर्वांना माहित आहेच. या साहित्य संमेलनापासून पहिली वेगळी चूल मांडण्याचे धाडस ख्रिस्ती साहित्य संमेलनाने १९२७ साली झालेल्या नाशिकच्या संमेलनाद्वारे केले. या १९२७ पासून सुरु झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांच्या भाषणांचे दस्तऐवजीकरण २००१ सालच्या संमेलनापर्यंत सुनील आढाव यांनी केले आहे. त्यानंतरच्या संमेलनाध्यक्षीय भाषणांचे संकलन आता मी करत आहे. माझा हा प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात असताना दरम्यान त्यावेळचे महाराष्ट...
Posts
Showing posts with the label Jotiba Phule
- Get link
- X
- Other Apps
जोतिबा फुले हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे एक गुरु. जोतिबांचे पहिलेवहिले आधारभूत अनेक संदर्भटिपांसह चरित्र धनंजय कीर यांनी लिहिले ते डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणामुळेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र कीर यांनी चरित्रनायक हयात असताना आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून लिहिले आहे. फुले यांचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा कीर यांना कशी मिळाली याविषयी कीर यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिले आहे. त्या प्रस्तावनेच्या पहिल्याच परिच्छेदात कीर लिहितात: ``डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र मी लिहीत असताना एका भेटीच्या प्रसंगी, महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्याचा आपला मानस आहे असे बाबासाहेबांनी मला सांगितले. परंतु आपली प्रकृती ढासळत असल्याने हे कार्य आपल्या हातून सिद्धीस जाईल किंवा नाही अशी त्यांनी शंका प्रदर्शित केली. त्यावर मी स्वयंस्फूर्तीने उत्तरलो, ``बाबासाहेब, ते कार्य आपण करू शकला नाहीत तर मी ते तडीस नेण्याचा प्रयत्न करीन'. डॉ बाबासाहेब हे, भगवान बुद्ध व महात्मा कबीर या आपल्या दोन गुरुंच्या बरोबरीने महात्मा फुले याना आपले तिसरे गुरु मानीत. डॉ आंबेडकरांचे हे संकल्पित कार्य नि उत्कट इच्छा ह...
- Get link
- X
- Other Apps
गांधीजी यांच्याइतकी राजमान्यता आणि लोकमान्यता देशात गेली अनेक दशके इतर कुठल्याही व्यक्तीला मिळालेली नाही. गांधींना मानत नसलेली सत्ता आज देशात आणि राज्यात आली तरी त्यात कुठलाही बदल झाला नाही हे तर गांधींची अपरिहार्यता आणि थोरवीच अधोरेखित करते. सत्तरच्या दशकात श्रीरामपूरला आमच्या शाळेत ज्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या होत त्यांत गांधीबाबा होते, पंडित नेहरु होते, टिळक आणि सावरकर होते, भगत सिंगसुद्धा असावेत. टिळक पुण्यतिथीला १ ऑगस्टला हमखास वकृत्व स्पर्धा असायची. शिवाजी महाराजांचा शाळेत फोटो असायचा, मात्र शिवजयंती वगैरे उत्सव साजरे होत नसत. शाहू महाराज, जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचा तर कुठल्याही कार्यक्रमात नावाने उल्लेखसुद्धा नसायचा. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस आणि ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस गोव्यात पणजीला पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात तत्त्वज्ञान माझा खास विषय होता, त्यावेळी टिळकांचे `गीतारहस्य', मानवेंद्र नाथ रॉय आणि गांधीजी भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात होते. जोतिबा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्त्वज्ञानाच्या किंवा इतर कुठल्याही शाखांतल्या अभ्यासाचा ...