Posts

Showing posts from 2022
Image
महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारसरणी   देशात आणि राज्यात आज काहीही परिस्थिती असली तरी महाराष्ट्रात आजही महात्मा फुले, शा\'हू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रागतिक वारसा चालू आहे याचा प्रत्यय काल आला. महाराष्ट्रात वर्षांतून अनेक शहरांत काही ठराविक दिवशी प्रागतिक विचारसरणीच्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते, त्यापैकी एक दिवस म्हणजे सहा डिसेंबर काल होता. कोरोना काळात मोठा खंड पडल्यानंतर काल पहिल्यांदाच पुन्हा एकदा या पुस्तक महोत्सवात गेलो आणि खूप बरं वाटलं. महाराष्ट्र देशी वेळोवेळी होणाऱ्या विविध राज्यस्तरीय, प्रादेशिक आणि इतर साहित्य संमेलनात भरपूर पुस्तक विक्री होते. पण केवळ महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रागतिक विचारसरणीला वाहिलेल्या ग्रंथाची आणि पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते ती ठिकाणे आणि दिवस विशिष्ट आहेत. हे दिवस म्हणजे एप्रिल बाबासाहेबांची १४ एप्रिलची जयंती, दसरा किंवा नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचे आपल्या अनुयायांबरोबर नागपूरला दीक्षाभूमीवर झालेले धर्मांतर, आणि सहा डिसें
Image
मुकुंद भुते. दैनिक `केसरी'त मधुकर प्रभुदेसाई आणि प्रमोद जोग यांच्या पत्रकारितेच्या तालमीत तयार झालेला छायाचित्रकार. मी पुण्यात आलो, गोव्यात गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा जसा सक्रिय कार्यकर्ता होतो तसाच मग पुणे श्रमिक पत्रकार संघात सक्रिय झालो तेव्हा मुकुंद भुतेशी ओळख झाली. आणि तशीच ओळख कायम राहिली. पत्रकारितेत नव्या पिढीला आम्हा दोघांचं नातेसंबंध सांगताना मुकुंद हमखास नव्वदच्या दशकातील पत्रकार संघातील त्या घडामोडी आणि प्रभुदेसाई आणि प्रमोद जोग यांचं नाव घ्यायचा. काही काळानंतर टाइम्स ऑफ इंडियात मी रुजू झालो तेव्हा मुकुंद भुते माझा सहकारी होता, `टाइम्स' सोडून मी सकाळ वृत्तसमूहाच्या `महाराष्ट्र हेराल्ड'ला जॉईन झालो, तेव्हा तिथेही मुकुंद आला. महाराष्ट्र हेराल्डचे सकाळ टाइम्समध्ये रूपांतर झाले आणि कोविडकाळात या दैनिकाची शेवटची आवृत्ती निघाली तोपर्यंत म्हणजे तब्बल चौदा-पंधरा वर्षे मुकुंद आणि मी सहकारी होतो. ख्रिसमसच्या आठवड्यात दरवर्षी माझ्या घरी बातमीदार मंडळींसाठी होणाऱ्या सेलेब्रेशनला मुकुंद कधी गैरहजर नसायचा. पार्टीच्या उशिरापर्यंतच्या शेवटपर्यंत त्याची साथ असायची. कार्य
Image
एकमेव प्रवेशद्वार पाटो ब्रिज   गोव्याची राजधानी पणजी येथे चारशे-पाचशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या काही वास्तू आणि इतर बांधकाम आहेत. पोर्तुगीज राजवटीची पहिली राजधानी असलेल्या ओल्ड गोवा येथे तर त्याहून अधिक जुनेपुराणे बांधकामे आहेत. पोर्तुगिजांनीं आपली राजधानी नोवे गोवा किंवा पणजी येथे १८४३ या साली हलवली आणि त्यानंतर इथला आधीच असलेला आदिलशाहचा राजवाडा मग पोर्तुगीज इंडियाचे मुख्यालय बनला. त्यानंतर या पणजी येथे पोर्तुगीजांनी पाश्चात्य धर्तीच्या अनेक इमारती बांधल्या, पोर्तुगीज राजवटीच्या वेगवेगळ्या खात्यांची आणि संस्थांची कामकाज या इमारतींतून चालायचे. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतीय लष्कर पाठवून गोवा, दमण आणि दीव पोर्तुगीज सत्तेतून मुक्त केला आणि मग पोर्तुगीजकालीन या इमारती विविध सरकारी खात्यांची, लष्करी विभागांची कार्यालये बनल्या. मांडवीच्या तिरावरचे आदिलशाह पॅलेस अनेक वर्षे गोवा, दमण आणि दिवचें सचिवालय आणि विधानसभा भवन होते. पणजी येथे फॉन्टइनेस, कंपाल आणि अल्तिन्हो येथे सहज एक फेरफटका मारला तर पोर्तुगीजकालीन तीनशे-चारशे वर्षे जुनी असलेल्या आणि आजही अगदी सुस्थितीत असलेल
Image
पोप फ्रान्सिस सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहेत आणि जगभरातील नियतकालिके त्यांच्या या दौऱ्यावर लक्ष ठेऊन आहेत. जगभर धर्म आणि शासन यांची फारकत होत असताना आजही कॅथोलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु असलेल्या पोपमहाशयांना आजही महत्त्व दिले जाते हे मान्य करावेच लागेल. पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याहून लहान असलेल्या आणि सातशे नागरिक असलेल्या व्हॅटिकन सिटीला आज एक सार्वभौम देश म्हणून मान्यता आहे आणि या देशाचे पोप राष्ट्रप्रमुख आहेत. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर असताना मुद्दाम व्हॅटिकन सिटीला गेले आणि पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांना भारत भेटीचे अधिकृत निमंत्रण दिले आहे. गेली काही दशके तीन पदांवरील व्यक्तींविषयीं जगातील अनेक लोकांमध्ये अपार कुतूहल असते. या तीन पदांवरील व्यक्ती वर्षभर या ना त्या कारणाने, निमित्ताने जगभरातील प्रसार माध्यमांत सतत झळकत असतात. या तीन व्यक्ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ दुसऱ्या आणि रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख आणि व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे प्रमुख पोप. पोप हे ख्रिस्तमंडळाचे म्हणजे कॅथोलिक चर्चचे प्रमुख, येशू ख्र
Image
निवडणूक चिन्हे टी एन शेषन निवडणूक आयुक्त होण्याआधीची ही गोष्ट आहे. काळ साधारणतः सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीचा. श्रीरामपुरात काही मोक्याच्या जागी आणि रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या घरांच्या भिंतींवर आणि इतर बांधकामांवर पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर काही चिन्हे आणि घोषणा लिहिलेल्या असायच्या. त्यापैकी एक बैलजोडी असायची, गायवासरू असायचे, शहरी भागांत मिणमिणता दिवा असायचा. अनेक चित्रांत लाल रंगातलं विळा-कणीस हें चिन्ह असायचं, काही ठिकाणी विळा आणि हातोडा हे चिन्ह असायचं. देशातल्या लोकसभा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत रंगवलेल्या या चित्रांवर विविध पक्षांची ही निवडणूक चिन्हे, पक्षांची आणि उमेदवारांची नावे असायची. तर यापैकी बैलजोडी हे चिन्ह होतं मोरारजी देसाई वगैरे नेत्यांच्या संघटना काँग्रेसचं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये फार मोठी म्हणजे सरळसरळ उभी फूट पडली होती आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या गटासाठी बैलजोडीऐवजी नवे गायवासरू हे चिन्ह घ्यावं लागलं होतं. सन १९७१च्या सार्वत्रिक निवडणुका इंदिरा गांधींनी हे नवे निवडणुक चिन्ह घेऊन लढवल्या आणि
Image
भाजीपाव  गोंयकारांचो लोकप्रीय नाश्तो ... कोकणी अणकार केला  सुनेत्रा जोग  हांणी.. गोंयांत सगळ्याक नवी फांतोड उदेता ती एका खाशेल्या आवाजा सयत. "पुई-पुई'' असो सादारण तो आवाज आसता. तुमच्या वाठारांत पाववालो आयला अशें सांगपी तो आवाज. आदीं ऑटोरिक्षांक हॉर्ना खातीर हवेच्या दाबाचेर काम करपी एक उपकरण आसतालें, ताचो वांटकुळोच रबरी भाग दामतकच तातूंतल्यान `पुई-पुई' असो आवाज येतालो. तेंच उपकरण आपल्या सायकलीच्या हॅंडलाक बसोवन, तातूंतल्यान आवाज काडीत गोंयांत हे पाववाले वा पोदेर दरेका घराक आपल्या येवपाची खबर दितात.   आपल्या सायकलीचेर वेगवेगळ्या तरांचे पाव प्लास्टिका पोंदा धांपून ह्या वेळार पाववालो येता. पुर्तुगेज भाशेंत पाववाल्याक वा बेकरी मालकाक पोदेर म्हणटात. पुण्यांत दुदाच्या पोतयां खातीर फ्लॅटा भायर ग्रीलाक सकाळीं पोतयो हुमकळायिल्ल्यो आसतात. तश्योच गोंयां दरेका घराच्या कपांवंडाच्या गेटीक पावांखातीर पोतयो हुमकळायतात. दरेका घराचे सकाळ आनी सांजेचे वेगवेगळे पाव थारिल्ले आसतात. चड वा कमी जाय आसत जाल्यार तें मात सांगचें पडटा.   फाटल्या दिसांनी अंजुना-वागातोर दर्यादेगेर आशिल्ल्या भयणीच्या