Posts

Showing posts with the label Habeus Corpus
गोवा, दमण आणि दीव पणजीतल्या धेम्पे कॉलेजात बारावीसाठी प्रवेश घेतल्यापासून दमण आणि दीव हे चिमुकले प्रदेश माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. गंमत म्हणजे हे दोन छोटे प्रदेश मी कधी पाहिलेही नव्हते वा भारताच्या नकाशात त्यांचे स्थान नक्की कुठे आहे हेसुद्धा मला माहिती नव्हते. तरीसुद्धा या प्रदेशांशी मी जोडला गेलो आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे गोव्याबरोबरच दमण आणि दीव ह्या दोन प्रदेशांचा माझ्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेच्या प्रमाणपत्रात उल्लेख आहे. १९७५ पासून गोव्यातील दहावी आणि बारावीच्या त्याकाळच्या गोवा, दमण आणि दीव माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलया जायच्या. ह्या दोन प्रदेशांशी माझा संबंध जोडला जाण्याचे एकमात्र कारण गोव्याप्रमाणेच दमण आणि दीव हे दोन्ही प्रदेश पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतींचा सुमारे ४५० वर्षे एक भाग होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी ११ डिसेंबर १९६१ रोजी लष्करी कारवाई करून गोवा, दमण आणि दीव हे प्रदेश पोर्तुगीजांच्या सत्तेतून मुक्त केले. गोवा महाराष्ट्राच्या दक्षिणेला सागरी किनाऱ्यावर तर दमण आणि दीव गोव्यापासून शेकडो किलोमीटर दूर गुजरातच्...