आता मी जो अनुभव सांगणार आहे तसा अनुभव फार कमी लोकांच्या आयुष्यात आलेला असेल. अलीकडच्या अती सुरक्षेच्या काळात तर असे अनुभव फारच दुर्मिळ. आणीबाणीच्या काळातली ही घटना. इंदिराबाईंनी घोषित आणीबाणी शिथिल करुन लोकसभेच्या निवडणुका घेतल्या होत्या. निवडणुका पार पडल्या होत्या आणि मतदान मोजणीची वेळ आली होती. त्याकाळी देशभरातील लोकसभा निवडणुका दोनतीन टप्प्यांत होऊन लगेच मतदान मोजणी होत असे. या काळात म्हणजे १९७८ ला मी सातारा जिल्ह्यात कराड येथे जेसुईट प्री-नॉव्हिस म्हणून टिळक हायस्कूलमध्ये अकरावीत शिकत होतो. त्या आधीच घटनाक्रम आता काहीच लक्षात नाही, मात्र निवडणूक पार पडल्यानंतर त्या दिवशी अगदी भल्या पहाटेच एका ट्रकने काही लोकांसह मी कराडहून सातारा येथे मतदान मोजणी केंद्रात पोहोचलो होतो हे आठवते. हा, एक स्पष्ट आठवते. ट्रकने प्रवास करणारे आम्ही सर्व जण जनता पक्षाचे आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचे विरोधक होतो. मतदान मोजणी केंद्रात जनता पक्षाचे पाठीराखे म्हणून आमची भुमिका असणार होती. आम्ही जनता पक्षाचे पोलिंग एजंट म्हणून काम करणार होतो. आम्ही लोक कराडच्या मतदार संघातील जनत...
Posts
Showing posts with the label Satara
- Get link
- X
- Other Apps
निवडणूक चिन्हे टी एन शेषन निवडणूक आयुक्त होण्याआधीची ही गोष्ट आहे. काळ साधारणतः सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीचा. श्रीरामपुरात काही मोक्याच्या जागी आणि रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या घरांच्या भिंतींवर आणि इतर बांधकामांवर पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर काही चिन्हे आणि घोषणा लिहिलेल्या असायच्या. त्यापैकी एक बैलजोडी असायची, गायवासरू असायचे, शहरी भागांत मिणमिणता दिवा असायचा. अनेक चित्रांत लाल रंगातलं विळा-कणीस हें चिन्ह असायचं, काही ठिकाणी विळा आणि हातोडा हे चिन्ह असायचं. देशातल्या लोकसभा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत रंगवलेल्या या चित्रांवर विविध पक्षांची ही निवडणूक चिन्हे, पक्षांची आणि उमेदवारांची नावे असायची. तर यापैकी बैलजोडी हे चिन्ह होतं मोरारजी देसाई वगैरे नेत्यांच्या संघटना काँग्रेसचं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसमध्ये फार मोठी म्हणजे सरळसरळ उभी फूट पडली होती आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या गटासाठी बैलजोडीऐवजी नवे गायवासरू हे चिन्ह घ्यावं लागलं होतं. सन १९७१च्या सार्वत्रिक निवडणुका इंदिरा गांधींनी हे नवे निवडणुक चिन्ह घेऊन लढवल्या आणि...
महाबळेश्वरचे होली क्रॉस चर्च
- Get link
- X
- Other Apps
महाबळेश्वरचे होली क्रॉस चर्च महाबळेश्वरला तुम्ही कधी भेट दिली असेल तर या पर्यटक स्थळाच्या मुख्य बाजारपेठेत अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेले एक छोटेसे टुमदार बंगलीवजा बांधकाम तुम्ही नक्कीच पाहिले असणार. गेटपाशीच मदर मेरीचा डोंगर म्हणजे ग्रोटो आहे आणि बंगलीच्या शिखरवजा टोकावर क्रूस आहे. यावरुन हे एक कॅथोलिक चर्च आहे हे माहितगार व्यक्तीला लगेच कळते. महाबळेश्वर एसटी बसडेपोपासून एक मिनिटाच्या अंतरावर आणि टुरिस्ट टॅक्सींच्या वाहनतळापाशी हे महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अनेक कारणांनी आगळेवेगळे असलेले असलेले होली क्रॉस चर्च आहे. मुंबई आणि वसई परीसर वगळता उर्वरित महाराष्ट्रातील हे सर्वात जुने कॅथोलिक चर्च आहे. ब्रिटिश अमदानीत 1831 साली या चर्चची स्थापना झाली होती. जुन्या वास्तुशास्त्राच्या धर्तीवर बांधलेले हे ...
BBC news: Prime Minister Indira Gandhi defeated in Raebareli
- Get link
- X
- Other Apps
BBC news: Prime Minister Indira Gandhi defeated in Raebareli BBC news: Prime Minister Indira Gandhi defeated in Raebareli A few weeks after the Emergency was imposed, the situation was back to normal in the country. I, like most people in the country, was very Indignant that most political leaders opposed to the Congress and Prime Minister Indira Gandhi were imprisoned. The situation in the country had been very volatile for more than a year as a result of the students’ agitation in Gujarat and Bihar, the George Fernandes-led nationwide railway strike and the agitation led by Socialist leader Jaiprakash Narayan. The Allahabad High Court’s ruling disqualifying Prime Minister Indira Gandhi as Raibereli MP had come as the last straw on the camel’s back. Although I was then only a 10th standard student, I shared the people’s anger towards the Congress and Indira Gandhi. The atmosphere in the country at that time was surcharged. Indira Gandhi who realised that the situation was ...
अनुशासन पर्वाच्या आठवणी Discipline during the Emergency period
- Get link
- X
- Other Apps
बुधवार, १३ जून, २०१८ मुखपृष्ठ महाराष्ट्र देश-विदेश कला-साहित्य समाज अर्थ क्रीडा मनोरंजन करिअर न-नायक दिवाळीअंक मुखपृष्ठ देश-विदेश goo.gl/a4fxgB अनुशासन पर्वाच्या आठवणी बुधवार, १३ जून, २०१८ कामिल पारखे आणीबाणीचा कालखंड देशाच्या इतिहासातील काळाकुट्ट काळ समजला जातो. अर्थात शिस्तीचा कालखंड होता. मटके, खासगी सावकारी यांना चाप बसवणारा होता हेही लक्षात घेतले पाहिजे. तो दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वांत काळाकुट्ट समजला जातो. मात्र त्या दिवशी म्हणजे २६ जून १९७५ संपूर्ण दिवसभर देशभर काय घडामोडी होत होत्या याची सामान्य लोकांना काहीच कल्पना नव्हती. त्याकाळात दिवसभर जे काय घडायचे ते दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्रातून कळायचे. रेडिओ दिवसातून फारच कमी तास चालायचा आणि त्यातील बातम्या तर फारच कमी असायच्या. त्यावेळी मी नुकताच दहावी इयत्तेत प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जून १९७५ रोजी श्रीरामपुरात सकाळी मी माझ्या वडिलांसह आमच्या दुकानावर पोहोचलो आणि तेथे मी वर्तमानपत्र वा...