नुकतेच छापून झालेले माझे नवे पुस्तक `Journalism Stories From Goa and Maharashtra' विनिता देशमुख यांच्या कॉर्पोरेट ऑफिसात काल जाऊन मी दिले. बातमीदार आणि पत्रकार म्हणून माझी पूर्ण कारकीर्द ही केवळ इंग्रजी दैनिकांतली. सुरुवातीला गोव्यात The Navhind Times, त्यानंतThe Navhind Times, Times of Inia, Lokmat Times, र फक्त एक वर्षांसाठी छत्रपती संभाजीनगरात Lokmat Times, नंतर पुण्यात एक दशकभर Indian Express. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज रोडवर The Times Of India आणि अखेरीस सकाळ वृत्तमाध्यमाच्या Maharashtra Herald नंतरचे Sakal Times मध्ये तब्बल चौदा वर्षे नोकरी. तिथेच निवृत्ती. सन २००४ला शनिवारवाड्याशेजारच्या तेव्हाच्या त्या वाड्यावजा `सकाळ' संकुलात मी नोकरीला लागलो तेव्हा मी तेथे एव्हढा काळ टिकेल किंवा ते मला ठेवतील असे वाटलेही नव्हते, पण झाले ते खरे. मी मूळचा श्रीरामपूरसारख्या अस्सल निमग्रामीण परिसरातला मराठी माध्यमातला. असे असले तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नोकरी मी केवळ इंग्रजी दैनिकांत केली ते केवळ योगायोगाने वा अपघाताने असे म्हणता येईल. दहावीनंतर गोव्यात मी जे...
Posts
Showing posts from 2025
- Get link
- X
- Other Apps
गेली काही दिवस कर्मधर्मसंयोगाने डेक्कन जिमखाना पुन्हा एकदा माझ्या नेहेमीच्या वहिवाटीचा परिसर बनला आहे. या जागी मी आलो, इथलाच रहिवासी झालो ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी, ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस. इंडियन एक्सप्रेसला रुजू झाल्यावर इथेच ब्रिटिश कौंसिल लायब्ररीच्या (बीसीएल) च्या मागे मंथली कॉट बेसिसवर चार वर्षे राहिलो तेव्हा हॉटेल गुडलक जिवाभावाचे स्थळ बनले होते. काही महिन्यांपूर्वी वाचले होते कि हॉटेल गुडलकच्या इमारतीचे रिनोव्हेशन होणार असल्याने हे हॉटेल काही काळ बंद राहणार आहे. काल संघ्याकाळीच इथे गेलो तिथली आत बाहेरची नेहेमीची वर्दळ पाहिली तेव्हा ही घटिका आता इतकी जवळ आली अशी पुसटशी शंकाही मनात नव्हती. आज दुपारी आम्ही दोघेही इथे जात होते आणि गुडलक बंद दिसले आणि मनात चर्रर्र झाले. पण दारापाशी काहीच लिहिलेले नव्हते, थोड्या वेळाने परत तिथे आलो तेव्हा ती सूचना चारपाच ठिकाणी लिहिलेली दिसली. रिनोव्हेशनसाठी बंद आहे म्हणून. आता कळते कि अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे हे हॉटेल तात्पुरते बंद करण्यात आले आहे आता हॉटेल गुडलकच्या अनेक ठिकाणी शाखा उघडल्या आहेत, तिथे गेल्यावर या मूळ...
- Get link
- X
- Other Apps
जोतिबा फुले हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे एक गुरु. जोतिबांचे पहिलेवहिले आधारभूत अनेक संदर्भटिपांसह चरित्र धनंजय कीर यांनी लिहिले ते डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणामुळेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र कीर यांनी चरित्रनायक हयात असताना आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून लिहिले आहे. फुले यांचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा कीर यांना कशी मिळाली याविषयी कीर यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिले आहे. त्या प्रस्तावनेच्या पहिल्याच परिच्छेदात कीर लिहितात: ``डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र मी लिहीत असताना एका भेटीच्या प्रसंगी, महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्याचा आपला मानस आहे असे बाबासाहेबांनी मला सांगितले. परंतु आपली प्रकृती ढासळत असल्याने हे कार्य आपल्या हातून सिद्धीस जाईल किंवा नाही अशी त्यांनी शंका प्रदर्शित केली. त्यावर मी स्वयंस्फूर्तीने उत्तरलो, ``बाबासाहेब, ते कार्य आपण करू शकला नाहीत तर मी ते तडीस नेण्याचा प्रयत्न करीन'. डॉ बाबासाहेब हे, भगवान बुद्ध व महात्मा कबीर या आपल्या दोन गुरुंच्या बरोबरीने महात्मा फुले याना आपले तिसरे गुरु मानीत. डॉ आंबेडकरांचे हे संकल्पित कार्य नि उत्कट इच्छा ह...
- Get link
- X
- Other Apps
यहुद्यांच्या वऱ्हाडणाच्या Pass Over सणानिमित्त शिक्षा झालेल्या आणि सजा भोगत असलेल्या एखाद्या गुन्हेगारास तुरुंगातून मुक्त करण्याची प्रथा होती. त्याकाळात इस्राएल रोमन साम्राज्याचा एक भाग होते. येशू ख्रिस्ताला कुठल्याही शिक्षेपासून सोडवण्यासाठी इस्त्राएलमधील रोमन सुभेदार पिलात याने या प्रथेचा वापर करण्याचे ठरवले. कारण येशूने कुठलाही गुन्हा केला नाही असे त्याचे मत होते. मात्र त्याच्यासमोर जमलेल्या जमावाने 'येशूला नको, बाराब्बास याला तुरुंगातून बाहेर सोडा'' अशी मागणी केली. बाराब्बास हा एक दरोडेखोर होता. त्यामुळे नाईलाज होऊन पिलात याने बाराब्बास याला तुरुंगातून मुक्त केले आणि त्याऐवजी येशूला क्रुसावर खिळवून ठार मारण्याची सजा द्यावी लागली. अशा प्रकारे बाराब्बास तुरुंगातून बाहेर आला. आणि येशूला क्रुसावर टांगून मारण्यात आले.
- Get link
- X
- Other Apps
पोप पॉल सहावे यांचे निधन झाले तेव्हा मी बारावीला होतो. तो काळ मला आजही आठवतो त्याचे कारण त्या दिवसांत तीन मोठ्या माणसांच्या निधनांच्या बातम्या एकापाठोपाठ ऐकण्यात म्हणजे `निरोप्या' मासिकात वाचण्यात आल्या. पोप पॉल सहावे वारले सहा ऑगस्ट १९७८ला, भारताचे पहिले कार्डिनल व्हॅलेरियन ग्रेशियस त्यानंतर ११ सप्टेंबर १९७८ ला वारले आणि लगेचच नूतन पोप जॉन पॉल यांचे २८ सप्टेंबर १९७८ला निधन झाले. जॉन पॉल पहिले यांची कारकिर्द केवळ ३३ दिवसांची होती. एक महिन्याभरातच झालेल्या त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण जगाला बसलेला धक्का मला आजही आठवतो. चर्चच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक कमी काळ जॉन पॉल पहिले पोपपदावर होते. पोप पॉल सहावे यांचे कर्तृत्व म्हणजे पोप जॉन तेविसावे यांनी सुरु केलेल्या ऐतिहासिक दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेची सांगता त्यांच्या काळात झाली. दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेच्या निर्णयांचा एक परिणाम म्हणजे आम्ही श्रीरामपुरात आणि महाराष्ट्रात सत्तरच्या दशकात प्रार्थनेत आणि मिस्साविधीत लॅटिन भाषेऐवजी आमच्या मायमराठीचा वापर करु लागलो. पोप पॉल सहावे यांचे २ डिसेंबर १९६४ रोजी मुंबई येथे आगमन झ...
- Get link
- X
- Other Apps

"माणुसकी हाच धर्म' मुसलमान आणि ख्रिस्ती लोकांचा वर्षातील पवित्र मानला जाणारा उपवासकाळ सद्या चालू आहे. ख्रिस्ती लोकांचे कॅलेंडर ग्रेगरियन म्हणजे सौरवर्षीय आहे तर मुस्लीम धर्मियांचे कॅलेंडर चांद्रवर्षीय असते. त्यामुळे ख्रिस्तीजनांचा लेन्ट सिझन किंवा उपवासकाळ नेहेमीच फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला सुरु होतो आणि सुमारे चाळीस दिवसानंतर एप्रिलमध्ये गुड फ्रायडे या सणाने संपतो. तर मुस्लिमांचा रमझान महिना ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये वर्षभर कधीही असू शकतो. कुठल्याही धर्मात उपवासाच्या पवित्र काळात जे करावयाचे असते ते या काळात मुसलमान आणि ख्रिस्ती लोकसुद्धा करतात. उपवास धरतात, प्रार्थना करतात आणि त्यांनी याकाळात दानधर्म आणि इतर सत्कार्य करावे अशीही अपेक्षा असते. तर पुण्यातील रास्ता पेठेत राहणाऱ्या जावेद खान आणि मायकल साठे या दोघांनी त्यांच्या भिन्न धर्मांच्या या चालू पवित्र काळात एक वेगळ्या प्रकारचे पुण्यकर्म केले. त्यांच्या इमारतीशेजारी असलेल्या सुधीर किंकळे ( वय ७० वर्षे) नावाच्या माणसाचे निधन झाले, तेव्हा त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी एका बहिणीशिवाय इतर कुणीही ह...
- Get link
- X
- Other Apps

गांधीजी यांच्याइतकी राजमान्यता आणि लोकमान्यता देशात गेली अनेक दशके इतर कुठल्याही व्यक्तीला मिळालेली नाही. गांधींना मानत नसलेली सत्ता आज देशात आणि राज्यात आली तरी त्यात कुठलाही बदल झाला नाही हे तर गांधींची अपरिहार्यता आणि थोरवीच अधोरेखित करते. सत्तरच्या दशकात श्रीरामपूरला आमच्या शाळेत ज्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या होत त्यांत गांधीबाबा होते, पंडित नेहरु होते, टिळक आणि सावरकर होते, भगत सिंगसुद्धा असावेत. टिळक पुण्यतिथीला १ ऑगस्टला हमखास वकृत्व स्पर्धा असायची. शिवाजी महाराजांचा शाळेत फोटो असायचा, मात्र शिवजयंती वगैरे उत्सव साजरे होत नसत. शाहू महाराज, जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचा तर कुठल्याही कार्यक्रमात नावाने उल्लेखसुद्धा नसायचा. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस आणि ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस गोव्यात पणजीला पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात तत्त्वज्ञान माझा खास विषय होता, त्यावेळी टिळकांचे `गीतारहस्य', मानवेंद्र नाथ रॉय आणि गांधीजी भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात होते. जोतिबा फुले किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्त्वज्ञानाच्या किंवा इतर कुठल्याही शाखांतल्या अभ्यासाचा ...
- Get link
- X
- Other Apps
ईद मुबारक... आज सकाळी जरा उशीराच म्हणजे साडेदहाच्या सुमारास लक्षात आले की ईदच्या शुभेच्छा कुठल्याच ग्रुपवर तोपर्यंत दिसल्या नव्हत्या याचे एक खरे कारण म्हणजे या ग्रुपवर मुसलमान लोक एकतर नसतात किंवा त्यांची संख्या खूप कमी म्हणजे अगदी नगण्य असते. खरे तर नाताळ वगळता इतर कुठल्याही सणाच्या, वाढदिवसांच्या, जयंतीच्या आणि पुण्यतिथीनिमित्त मी पोस्ट टाकत नसतो. इतरांच्या सर्वांच्या शुभेच्छा असतात, मग त्यात गर्दी कशाला? असा एक विचार असतो. मात्र रमझान ईद असून सगळ्या ग्रुपवर ती शांतता पाहून मीच मग चारपाच ग्रुपवर ईद मुबारक च्या शुभेच्छा दिल्या. झाले, त्याबरोबर त्या सर्व ग्रुपवर ईद मुबारक च्या अनेक शुभेच्...