गोव्यात पणजी येथे `द नवहिंद टाईम्स' या इंग्रजी दैनिकात आणि नंतर छत्रपती संभाजीनगरला `लोकमत टाईम्स'मध्ये एकूण दशकभर क्राईम आणि हायकोर्ट रिपोर्टर ही बिट मी सांभाळली. तेव्हा वापरल्या गेलेल्या अनेक संज्ञांमध्ये `डायिंग डिक्लरेशन' किंवा मृत्यूपूर्व जबाब हा एक शब्दप्रयोग होता. मुख्यतः एखादी नवविवाहित महिलेचे जळीत प्रकरण असते तेव्हा तिला जाळण्यात आल़े किंवा तिने स्वतःला जाळून घेतले हे तिच्याकडून दंडाधिकाऱ्यामार्फत वदवून घेतले जाते. `डायिंग डिक्लरेशन'ला फौजदारी प्रकरणांत आगळेवेगळे महत्त्व असते. याचे कारण साधारणतः मृत्यूपूर्वी दिलेला जबाब खरा असतो असे मानले जाते. अर्थात मरणाला सामोरे जातानासुद्धा अनेक पतिव्रता महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आपण स्वतःलाच जाळून घेतले किंवा स्टोव्हचा अचानक भडका होऊन आग लागली असे म्हणत असत. याआधी श्रीरामपूरला असताना दैनिक `सकाळ' चे संस्थापक-संपादक नानासाहेब ऊर्फ ना. भि. परुळेकर यांनी मृत्युशय्येवर असताना `निरोप घेता' हे आत्मचरित्र लिहिले होते हे मला माहित होते. त्यानंतर अशाच पद्धतीने समाजवादी नेते एस. एम जोशी यांनी इस्पितळात असताना `मी...
Posts
- Get link
- X
- Other Apps
गोव्यात म्हापशात त्या रात्री साध्या वेशात असलेले इन्स्पेक्टर मधुकर झेंडे आणि मी कदाचित समोरासमोर आलोही असेल, मात्र त्यांच्याशी काही बोलणे शक्यच नव्हते. आपल्या मुंबई पोलीस टिममधल्या चारपाच लोकांव्यतिरिक्त कुणाशीही एक शब्दसुद्धा बोलण्याच्या मनःस्थितीत ते त्यावेळी नव्हते. त्या रविवार ६ एप्रिल १९८६च्या रात्री तिथे जमलेल्या आम्हा काही मोजक्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास त्यांना अजिबात स्वारस्य नव्हते. पर्वरी येथील `हॉटेल ओ कोकेरो' येथे चार्ल्स सोबराजच्या शिताफीने मुसक्या बांधल्यानंतर म्हापसा हॉटेलातून चेक-आऊट करून सोबराजसह शक्य तितक्या लवकर गोवा सोडून मुंबई गाठण्याच्या घाईत ते होते. काल शुक्रवार दुपारी घरच्या टिव्हीवर पिक्चर सुरु झाल्यानंतर `इन्स्पेक्टर झेंडे' असे चित्रपटाचे शिर्षक झळकले आणि डोक्यात तिडीक उठली. ''इन्स्पेक्टरसाठी हेच नाव निवडण्याची काही गरज होती काय?'' असे मी मोठ्याने बोललोसुद्धा. दोनचार मिनिटे गेली आणि लक्षात आले, ``अरे हो, हा तर मधुकर झेंडे आणि चार्ल्स सोबराज यांच्यावर चित्रपट आहे !'' त्यानंतर मी टिव्हीवरुन नजर वळवली. आज...
- Get link
- X
- Other Apps
सिसिलिया कार्व्हालो केरळमध्ये ख्रिस्ती धर्माची दोन हजार वर्षांची परंपरा असली तरी मल्याळी साहित्यात ख्रिस्ती मल्याळी साहित्य असा काही प्रकार अस्तित्वात नाही, अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असलेल्या तामिळ भाषेत मध्ययुगीन काळापासून ख्रिस्ती धर्मगुरूंनी अभिजात दर्जाचे साहित्य निर्माण केले आहे. त्या तामिळ भाषेतसुद्धा स्वतंत्र ख्रिस्ती तामिळ साहित्य असे काही नसते. भारताच्या इतर कुठल्याही राज्यांत, प्रदेशांत असे धर्माच्या नावावर ओळखले जाणारे साहित्य नाही. गोव्यात अनेक परदेशी ख्रिस्ती धर्मगुरूंनी कोकणी आणि मराठी साहित्य समृद्ध केले त्याचप्रमाणे अनेक नीज गोंयकारांनी लिस्बन, पॅरिस आणि रोम येथे जाऊन पोर्तुगीज, फ्रेंच वगैरे भाषांच्या साहित्यात म...
- Get link
- X
- Other Apps
गोव्यात आणि दमण, दीव, दादरा नगर हवेली या भारताच्या इतर प्रदेशांत पोर्तुगालची तब्बल साडेचारशे वर्षे सत्ता होती. यापैकी बहुतांश काळात या प्रदेशातील नागरिकांना पोर्तुगालच्या नागरिकांप्रमाणे पोर्तुगाल संसदेत निवडून येण्याचे अधिकार आणि हक्क होते. इंग्लंडमध्ये लोकशाहीची जुनी परंपरा आहे, लोकशाहीसाठी तिथल्या लोकांनी फार मोठी किंमत चुकती केली आहे. मात्र याच इंग्लंडने आपल्या साम्राज्यातील वसाहती देशांतील लोकांना मात्र या लोकशाही पद्धतीतील अधिकार आणि हक्क बहाल कधीही केले नव्हते. याउलट इंग्लंडच्या तुलनेत दीर्घ काळ एकाधिकारशाही अनुभवलेल्या पोर्तुगालने मात्र आपल्या साम्राज्यातील सर्व वसाहती देशांतील नागरिकांना पोर्तुगीज नागरिकांसारखे सर्व अधिकार आणि हक्क प्रदान केले होते. पोर्तुगीज नागरिकांप्रमाणे पोर्तुगालच्या सर्व वसाहतीमध्ये स्थलांतर करण्याचे अधिकार आणि हक्क गोवा, दमण आणि दीव दादरा, नगर हवेली यासारख्या इतर सर्व पोर्तुगीज वसाहतीतील लोकांनाही होते. यामुळेच पोर्तुगीज राजवटीच्या साडेचारशे वर्षांच्या कालावधीत पोर्तुगीज इंडियातील अनेक लोकांनी मोझाम्बिक, अंगोला वगैरे पोर्तुगीज वसाहतीत मोठ्या स...